मैत्री चे जगच वेगळे
जमतात जिथे सगळे ।
नाते जरी नसले तरी
असतात सारेच आगळे ।
उडवतात मग कशी
एकमेकांची दांडी ।
जणू प्रत्येकाच्या हाती
असते जादूची कांडी ।
उजाडताच येते आठवण
भेटल्याशिवाय गमत नाही ।
मित्रंशिवाय जवळचा तर
दुसरा कुणी असत नाही ।
घरी जे जे नसेल माहित
तेही जाणतात मित्र सारे ।
मैत्री मधे जीवही देतील
तोडून कठीण सारे पाहरे ।
गरीब श्रीमंत न भेद कुठला
मैत्री विना तो कोण सुटला ।
कृष्ण सुदामा सखे सोबती
धागा तोही नाही तुटला ।
Sanjay Ronghe
No comments:
Post a Comment