एकेक लागला गळायला
नी पाय माझे वळायला ।
काळ लोटला वेळ लोटली
मित्रांसाठी लागलो हळहळायला ।
दिवस तेव्हाचे आठवतात
भारी वाटायचे याच मित्रात ।
शाळा सुटली नोकरी लागली
काम काम तेच होतं कर्मात ।
आता थोडी मिळाली उसंत
बोलावे भेटावे वाटत मित्रांना ।
पण तेही निघालेत दूर आता
सांगा थांबवू कसे मी सर्वांना ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment