आजूबाजूला बघतो जेव्हा
माणुसकीचा दिसतो अंत ।
स्वातंत्र्य हे टिकणार कसे
आहे मनाला हीच खंत ।
महाराज कोणी होतो बाबा
म्हणतो आहे मीच संत ।
व्यभिचारी इथे दुराचारी
होऊन फिरतात मोठे महंत ।
राजकारण्यांचे नाव नको
दाखवतील ते वाचले ग्रंथ ।
तोडा फोडा राज्य करा
एकच त्यांचा मूळ मंत्र ।
जाती जातीत द्वेष किती
विचारतात ते कुठला पंथ ।
हिंदू मुस्लिम शीख ईसाई
मारा मारा कोण म्हणतं ।
नाही उरली माणुसकी हो
चिरडतात ते जसा जंत ।
विनाशाच्या वाटेवरचा
समोर दिसतो होईल अंत ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment