भावनांचा तुटला बंध
मन झाले विभोर ।
आठवणींचा नको आभास
जिवा लागे घोर ।
क्षणभर वाटे हवा थोडा विसावा
पण मन होते आतुर ।
एकांत वाटे मग हवा हवा
कधी मन होते फितूर ।
येती मनात किती विचार
डोळ्यात आसवांचा पूर ।
नको वाटे सारे आता
जावे कुठेतरी दूर ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment