कधी चाले कट्टी
परत होई बट्टी ।
लहानपणी मित्रांशी
असे अशीच गट्टी ।
तेव्हाही स्वभाव
असायचा हट्टी ।
भावना निरागस
अविचारांना सुट्टी ।
मोठे झालोत आता
होते कधी कट्टी ।
पण विचार सरलेत
स्वभावही हट्टी ।
विसरतात सारं
घेत नाहीत बट्टी ।
आयुष्य सरते
आणि होते सुट्टी ।
सुटते इथेच सारं
सोडा कट्टी बट्टी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment