मनात आहे एक
अनामिक भीती ।
थांबते तिथेच मग
विचारांची गती ।
होईल कुठली
किती ही क्षती ।
कळतच नाही या
माणसाची रीती ।
छळतो माणूसच
माणसास किती ।
गुन्हा कुणाचा
कुणाच्या हाती ।
मना मनांत रे
घडू दे ना प्रीती ।
देवा सारेच आहे
तुझ्याच हाती ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment