इति पासून अंता पर्यंत
प्रवास हा एकट्याचा ।
वाटेत प्रवासी बहुत
चाले संवाद अंतराचा ।
वाट ही वाळणांची
खाचा आणि खळग्यांची ।
घेऊनिया काळजी सारी
पदक्रांत ती करायची ।
दुःखाचे काटे कुठे
हाव सुखाच्या वाटेची ।
पडता पाऊल मधे
होते दैना जीवनाची ।
जन्म मृत्यू दोन टोके
त्यात जाळी जीवनाची ।
प्रवास हा एकट्याचा
सोबत त्यात अंतराची ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment