रे मानावा
केलेस तू भूत आपले
जीवन तुझे रे तिथेच सरले ।
झालास तू बाहुले त्याचे
अस्तित्व तुझे रे कुठे उरले ।
आचार विचार देऊन सारे
सांग कुणास तू घडवले ।
अविचारी तूच महान
साऱ्यांना तर तूच रडवले ।
यंत्र झालेत सर्वस्व आता
जे जे होते सारे पढवले ।
बुद्धिवान ते यंत्र झाले
कामात तुझ्या तुला अडवले ।
गरज कुणास आता तुझी रे
तुझ्या विनाच होईल सारे ।
निर्बुद्ध तू ठरशील आता
अक्कल तुझी , तुझेच तारे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment