कशाला करतो रे
कष्ट तू राजा ।
धावपळ सारी
नशिबात रे तुझ्या ।
बैल म्हणतात तो
हाच का रे आज्या ।
नाही मर्यादा
कामाला रे तुझ्या ।
सदाच जुतलेला
बैला तू माझ्या ।
सण तुझा पोळा
कर आराम गज्या ।
बैल म्हणून जग
हीच तुझी सज्या ।
Sanjay R.

कशाला करतो रे
कष्ट तू राजा ।
धावपळ सारी
नशिबात रे तुझ्या ।
बैल म्हणतात तो
हाच का रे आज्या ।
नाही मर्यादा
कामाला रे तुझ्या ।
सदाच जुतलेला
बैला तू माझ्या ।
सण तुझा पोळा
कर आराम गज्या ।
बैल म्हणून जग
हीच तुझी सज्या ।
Sanjay R.


भावनांचा खेळ हा सारा
आकाशात कुठे एकच तारा ।
कधी वाहतो सोसाट्याचा वारा
तर कधी बरसतात धारा ।
भिजायचं होऊन स्वच्छंदी
वेचायच्या आनंदात गारा ।
Sanjay R.

ठाऊक कुणास आता
माणसाचे माणसाशी नाते ।
कुणी येतो जन्माला
कुणाची यात्रा बघा दूर जाते ।
भावनांची कदर कुठे
जगायचे म्हणून जगतो आता ।
देवही नसतो सोबतीला
विसरतो कसा रे माता पिता ।
बाळपणी तू होता निरागस
आता किति रे मोठा झालास ।
थांबव थोडे दिवसांना बघ
नको बोलवू म्हातारपणास ।
Sanjay R.


नशिबाचा खेळ सारा
येईल कधी कुठून वारा ।
काळ्या रात्री अंधारात
उजळेल मृत एक तारा ।
जगभर होईल कीर्ती
लखलख परिसर सारा ।
निरभ्र आकाशातून मग
बरसती कौतुकाच्या धारा ।
Sanjay R.


आयुष्यभर माणसाला
करावे लागतात किती कष्ट ।
मागेच लागून असते
भूक पोटाची किती ती दुष्ट ।
टीचभरच ना हे पोट
भूक बघा ही त्याची किती ।
तरी इच्छेचा महासागर तो
नेहमीच असते ना ती रीती ।
आयुष्यभर करून कष्ट
होते शरीराची किती क्षती ।
लाभते म्हातारपण मग
आणी सोसवत नाही गती ।
Sanjay R.

हाती ज्याच्या दोर
लावतो तो जोर ।
होतो मग चोर
अपराध कुठे घोर ।
घेतो मिरवून आणि
होतो मोठा थोर ।
गरिबास हवी असते
भाकरीची एक कोर ।
पोटासाठी होता चूक
पडतात उघडी पोरं ।
Sanjay R.


जगण्यासाठी कुठे
असते कुठले कारण ।
रोजच तर जगतो
येईल कसे मरण ।
दुःखात शोधत आनंद
बांधू सुखाचे तोरण ।
मार्ग सत्याचा धरुनी
पुढे जायचे धोरण ।
बहू अडचणी जीवनात
करायचे पार चरण ।
सिद्धी कार्याची होता
येईल सुखाचे मरण ।
Sanjay R.





फडफड तनात होते
तडफड मनात होते ।
काळजास चाहूल होता
धडधड उरात होते ।
नजर दूर वाटेवर
मनही आतुर होते ।
क्षण अधीर होता
डोळ्यात पूर येते ।
Sanjay R.
मनात माझ्या तू
सांगू कसे तुला ।
छळतेस किती कशी
स्वप्नात तू मला ।
आहेस तू कविता
शब्दांची तू सरिता ।
आहेस तूच मनात
म्हणून
फुलते ही कविता ।
श्रावणातली सर तू
क्षणात दूर जाते ।
परी अंतरात माझ्या
आठवण तुझीच राहते ।
भिजून चिंब धरा ही
हिरवे गीत गाते ।
पूर आठवणींचा बघ हा
नेत्राच्या कडेतून वाहते ।
Sanjay R.

रूप आणि रंग
हवा गुलाबाचा संग ।
मन मोहरले माझे
गुलाबात मी दंग ।
काय कुणाचा छंद
होतो मोगराही धुंद ।
कळी गुलाबाची झुले
संगे वारा वाहे मंद ।
सलतो काटा मनात
राहूनही तो झाडात ।
करून मन मोकळे
जाते सल क्षणात ।
Sanjay R.




भक्ती करतो, करतो पूजा
सांगा कुठे हो आहे देव ।
भाव मनात माझ्या त्याचा
नाही मज कुणाचे भेव ।
असेल नसेल मंदिरात तो
श्रद्धा, विश्वास निरंतर ठेव ।
कर्ता करविता तोच आहे
अंतरात बघ तू तिथेच देव ।
माणसातला तू माणूस होऊन
जिवंत थोडी माणुसकी ठेव ।
तूच होशील माणूस असा की
दिसेल तुजला तुझ्यात देव ।
Sanjay R.




नही तुम दूर हमसे
हो बसे दिलमे हमारे ।
जी चाहता जब मिलनेका
याद करते सपने सारे ।
खुशीयोके वो सारे पल
आखोमे बसे सारे नजारें ।
मीले राहत दिलको और
करे दिल दिलको इशारे ।
Sanjay R.

अंगत झाली पंगत झाली
दिसभर दोस्तायची मले
भाऊ मस्त संगत झाली
उखाने झाले पाखाने झाले
शायेतल्या जमान्यांचे मंग
तश्शेच सारे धिंगाने झाले
हरिक होता सर्यायलेच
मारामारी भांडणायचे
किस्से गाऊन झाले
निंगा म्हने आता सारे
घरी जाचा वकत आला
तोंडं सऱ्यायचे सुकून गेले ।
दोस्तायन दोस्तायले
हात हलवून जाय जाय केले ।
Sanjay R.


सरसर सरसर
कोसळतात सरी ।
रात्र नशिली आणि
सोबतीला तुं गं परी ।
झाले धुंद तनमन
वाटे घ्यावे धुंद भिजून ।
अलगद टिपून घ्यावे
थेंब ओठावरचे अजून ।
हात घेऊन हातात
कवेत तुजला घ्यावे ।
वाटे रेशमी स्पर्शात
एकरूप तुझ्यात व्हावे ।
Sanjay R.

अखंड माझा हा भारत
काश्मीर ते कन्याकुमारी ।
फडकला तिरंगा आता
उत्साह फुलला दिशा चारी ।
स्वप्न गेलेत तुटून त्यांचे
नवाबी थाटात जगणे ज्यांचे ।
आतंक दहशत वादच सम्पला
सांडवू रक्त आता घुसखोरांचे ।
सुजलाम सुफलाम देश आमचा
काश्मीर आमचे नंदनवन ।
हसेल बगडेल सारेच आता
लाल चौकात फुलवू वृन्दावन ।
Sanjay R.





