स्वप्नांना कुठे काही
वेळ काळ असते ।
दिवस असो वा रात्र
मन त्यातच वसते ।
कधी आकाशात भरारी
कधी पाय नभावरी ।
समुद्राच्या लाटांमधून
वाट जाते इंद्राच्या दारी ।
दरबार इंद्राचा कसा
वाटला मज कसातरी ।
रंभा मेनका तिथल्या
त्याहून आपली वसुंधरा बरी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment