सोसतो बिचारा तो
होत आहेत किती हाल ।
नाहिच कुणाला काळजी
करताहेत त्याला हलाल ।
पोशिंदा सार्या जगाचा तो
नाहि कष्टाचा त्यास मलाल ।
टकमक बघताहेत सारे
नाग विषारी ते जहाल ।
सहनशिलता संपली आता
लुटारुंची फौज विशाल ।
दुर नाही बळिराजाचा दिवस
न विझणारी पेटेल मशाल ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment