Friday, March 15, 2019

" दूर किती तू "

धडधडते हृदय माझे
सळसळतो वारा ।
होता आठवण तुझी
चमचमतो तारा ।

दूर किती तू आहेस
त्या पर्वतांच्या पल्याड ।
अंतरास मात्र वाटे
इथेच तू पापणीच्या अल्याड ।
रिमझिम रिमझिम होते जेव्हा
पावसाची बरसात ।
बेधुंद होऊन घेतो भिजून
हातात तुझाच हात ।

ठेवले मी डोळ्यात जपून
नजरेचे ते इशारे ।
वाटेवर तुझ्याच थांबले
माझे श्वास सारे ।

करू नकोस उशीर आता
प्राण माझे कंठाशी आले ।
जगेलं कसा तुझ्याविना मी
स्वप्न माझे तूच झाले ।
Sanjay R.

" आभास "

आठवण आली ना
की व्हायचे भास ।
अंतरातच मग थोडे
थांबायचे श्वास ।

आजही कशी मज
आली तुझी आठवण ।
मन झालं थोडं अधीर
जीव झाला कण कण ।

उचकीने मांडला उच्छाद
कानांनी घेतली साद ।
नजर झाली भिर भिर
वाटले व्हावा थोडा संवाद ।

मनात तुझाच ध्यास
नव्हते काहीच लक्षात ।
स्वप्नच अवतरले जणू
पुढ्यात तूच साक्षात ।

बघितले तुझे लाजनें
गालात थोडे हसणे ।
नेत्रांचा तुझ्या दिवना
रूप तुझे किती देखणे ।

सुखावून गेला तो क्षण
भान माझे हरपले ।
फुल गुलाबाचे जणू
मी हृदयात माझ्या जपले ।
Sanjay R.

Wednesday, March 13, 2019

" निवडणूक 2019 "

आली आली
निवडणूक आली ।
राजनेत्यांची धावपळ
सुरू झाली ।

हुशार किती हे नेते
वाटे मतदार सारे मूर्ख ।
खरे खोटे सारेच ठाव
फेकतात काढून सारा अर्क ।

होळी यांची झाली सुरू
माखून जातील चिखलात सारे ।
इलेक्शन म्हणजे सावळा गोंधळ
भिनले अंगात वारे ।

बेशरमकीची करतील हद्द
जिवंतपणीच घालतील श्राद्ध ।
मान सन्मान तुडवत पायी
बरबटलेले सारेच दाखवतील शुद्ध ।

दगडास लावतील शेंदूर
टाकून तेल चपा चप ।
मांडून दगड होतील फरार
लुटतील देश मग झपा झप ।
Sanjay R.

Friday, March 8, 2019

" करू किती गुण गान "

कोमळ मनाचे पान
आहेस किती छान ।

घराची तू आन
तूच कुटुंबाची शान ।

सागरा इतके ज्ञान
कर्तृत्वात विज्ञान ।

आई ची माया
बहिणीची छाया  ।

अर्धांगिनीचे आहे
तुजला  किती भान ।

अंबा तू जगदंबा तू
देवतेचे तूच निशाण ।

झाशीची राणी तू
कृष्णाची राधा तू ।

विचारांची तू खाण ।
किर्ती तुझीच महान ।

रूप तुझे गं हजार
करू किती मी गुणगान ।

वंदन करतो तुज पूजितो
तूच आमुचा सन्मान ।
Sanjay R.

Thursday, March 7, 2019

" अशीच एक सायंकाळ "

अशीच एक सायंकाळ
पक्षी निघाले घराला ।
मावळतीच्या सूर्याने
तांबडे केले आकाशाला ।
हळूच डोकावून बघते रात्र
निमंत्रण गेले अंधाराला ।
चांदणी शोधते चंद्र
येईल कसा तो अमावसेला ।
हिरमुसली चांदणी मनात
उरलेत दिवस किती पौर्णिमेला ।
Sanjay R.