सहजच मनात
विचार आला
सुर्याला इतका
का ताप आला ।
चटचटतं अंग
नि घामाच्या धारा ।
गेला कुठे असेल
थंड गार वारा ।
झाडांचीही पानं
गळुन दुर गेली ।
छोटी छोटी रोपटी
केव्हाच मरुन गेली ।
नद्या नाले विहीरी
सुकुन कोरडे झाले ।
व्याकुळ झाले सारे
गळे सुकुन गेले ।
थेंब थेंब पाणी
मृगजळ झाले ।
डोळ्यातले अश्रु
रुसुन आज गेले ।
Sanjay R.