काय सांगु राव
नाही कापसाला भाव ।
निवडणुकी आधी
किती मारला ताव ।
चांगल्या दिवसांची
किती वाट पहाव ।
शेतकरी करतो
किती धावाधाव ।
चोर तो माल्या
बनुन बसला साव ।
व्यापार्यांना कीती
पैशाची हाव ।
उपाशी पोटी
झोपतो सारा गाव ।
मेहनत करुनही का
त्यानेच असे मराव ।
उठा कोणीतरी
सांगा बाजार भाव ।
मंतर द्या म्हणा
नाहीतर दिसेल प्रभाव ।
अतीच होतय आता
विसरा घुम जाव ।
जागा झाला बळी तर
उरणार नाही नाव ।
Sanjay R.