ऊन लागले तापायला
आली आता होळी ।
लाकडं हवेत जाळायला
आणू चला मोळी ।
जंगल झालेत ओसाड
मिळेना साधी फळी ।
पक्षांची नाही चिवचिव
आटली सारीच तळी ।
रंगपंचमीचा लाल रंग
लावू कसा मी भाळी ।
गुलाल झोंबतो गालाला
मग होते पळा पळी ।
रंगांचा हो होतो भंग
उतरतेच कसे गळी ।
कुणी असतात बेहोश
खातात का ती गोळी ।
उत्साहाला लागते विर्जण
प्रथाच वाटते काळी ।
आनंदाला नका विसरू
घ्या हातावरती टाळी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment