माणसांनीच लावायचं
माणसाचं झाड ।
माणसांनीच माणसांना
म्हणायचं ते पाड ।
कशाला हवेत
फाजिल असले लाड ।
उपटुन टाका दुनिया सारी
आली अंगात राक्षसी धाड ।
सरली माणुसकी उरला
दगडांचा नुसता पहाड ।
भावनांचा ओलावा
कुठे उरला काही ।
रक्तपात व्याभीचार
पसरला दिशा दाही ।
नाती गोती सारेच सरले
पैसाच आता सर्व काही ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment