Thursday, December 18, 2014

" माणुसच माणसाचा वैरी झाला "

माणुसच माणसाचा
कसा दुष्मन झाला ।
नारपराधांची नाही
उरली तमा त्याला ।

रणांगणात लढण्याचे
उरले नाही सामर्थ्य ।
लपुन छपुन मारायचे
यातच त्यांचा स्वार्थ ।

रक्तपात घडवायचा
एवढेच त्यांचे उद्दीष्ट ।
अविचारी झालेत ते दुष्ट
अभागी मात्र भोगतो कष्ट ।

पांढरा स्वच्छ शांतीध्वज
शरमेन लाल झाला ।
नाही उरली  दया माया
माणुसच माणसाचा वैरी झाला ।
Sanjay R.

No comments: