माणुसच माणसाचा
कसा दुष्मन झाला ।
नारपराधांची नाही
उरली तमा त्याला ।
रणांगणात लढण्याचे
उरले नाही सामर्थ्य ।
लपुन छपुन मारायचे
यातच त्यांचा स्वार्थ ।
रक्तपात घडवायचा
एवढेच त्यांचे उद्दीष्ट ।
अविचारी झालेत ते दुष्ट
अभागी मात्र भोगतो कष्ट ।
पांढरा स्वच्छ शांतीध्वज
शरमेन लाल झाला ।
नाही उरली दया माया
माणुसच माणसाचा वैरी झाला ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment