आठवणींच्या डोहात
विचारांचे जाळे ।
डोळ्यात थेंब आसवांचे
पापणीच्या आड तळे ।
मन होते जेव्हा उदास
काय कुणास कळे ।
अंतरात धगधगते आग
मन मनात जळे ।
चन्द्र डोकावतो आकाशात
अंगणात त्याच्या खळे ।
चांदण्या दुरून हसतात
बघूनक मजला छळे ।
Sanjay R.
काय मनात माझ्या
हवे वाटे आभाळ ।
नकोच कधी रात्र
फक्त व्हावी सकाळ ।
उजेडाशी ही कशी
जुळली इथे नाळ ।
रात्र नाही वाईट
घेऊ कसा मी आळ ।
चन्द्र आणि चांदण्या
करती शांत जाळ ।
रजनीचे गळ्यात
प्रकाश टाके माळ ।
Sanjay R.
कोण येतो नि
कुठे तो जातो ।
रिकामाच येतो
नि काय नेतो ।
मी मी करतो
कुठे तो उरतो ।
कधी हसतो
डोळे पुसतो ।
श्वास भरतो
मधेच हरतो ।
इथेच जगतो
इथेच मरतो ।
माणूस असतो
माणूस नसतो ।
Sanjay R.
कसा जगायचा
जीवनाचा हा डाव ।
आयुष्यभर चाले
फक्त धावाधाव ।
कोण कुणाचा इथे
असले जरी नाव ।
हास्याच्या पलीकडे
रक्तबंबाळ घाव ।
डोळ्यात शोधा जरा
आसवांचा तिथे ठाव ।
Sanjay R.