कशी कुठून कुठे जाते ।
जोरात मग हलवून जाते ।
मनही कसे विसरून जाते ।
आठवण उफाळून येते ।
आठवणींची आठवण होते ।
Sanjay R.
कविता तुझ्या मौनाची
कथा ही जीवनाची ।
मौन तुझे निरंकाळ
शब्दांचा झाला दुष्काळ ।
नजरेला नजर नाही
कानावरती गजर नाही ।
आकाशाचे आभाळ झाले
ढगांमधून थेंब आले ।
सरसर सरसर ओले ओले
भिजून सारे चिंब झाले ।
Sanjay R.
बाप्पा निघाले परतीला
चला जाऊ या आरतीला ।
दिवस दहा आम्ही केली सेवा
आनंदाचा तुम्ही दिला मेवा ।
भाव भक्तीचा मनात भरला
राग द्वेष आता नाही उरला ।
प्रसाद मोदक प्रकार किती
उत्साहाच्या पेटल्या वाती ।
करू चला हो जयघोष आता
आरती गणेशाची गाता गाता ।
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या ।
Sanjay R.
आज दिवस तीन झाले
आला थोडा ताप ।
खोकल्यासोबत बघा
कशी लागते धाप ।
लागत नाही लक्ष
नकोच वाटते जेवण ।
दुखणे तीव्र हात पायाचे
कडू औषधांचे द्रावण ।
मळमळ वाटते थोडी
तोंडाला नाही चव ।
लाडू पेढे काहीही आणा
पांघरुणात ही लागते दव ।
पडायचे बिछान्यावर
सांगा झोपायचे किती ।
पडून पडून थकलो
दिवस आणि रात्र रीती ।
अशक्त वाटे शरीर
मनही झाले अस्वस्थ ।
होऊ दे ना बरे आता
येईल फिरून मस्त ।
Sanjay R.