करायचा कसा उपवास
भरायचा एक एक श्वास ।
अन्नविना मग करायचा
पूर्ण दिवसाचा प्रवास ।
करून परमेश्वराचे चिंतन
अंतरातल्या स्वत्वाचा ध्यास ।
आचार विचारांची शुद्धी
एक आत्मविवेचनाचा प्रयास ।
Sanjay R.
करायचा कसा उपवास
भरायचा एक एक श्वास ।
अन्नविना मग करायचा
पूर्ण दिवसाचा प्रवास ।
करून परमेश्वराचे चिंतन
अंतरातल्या स्वत्वाचा ध्यास ।
आचार विचारांची शुद्धी
एक आत्मविवेचनाचा प्रयास ।
Sanjay R.
वाद विवाद हे सरले आता
दाहशतीची सुरुवात आता ।
रक्ताची या किंमत काय
नको कुणाला साथ आता ।
छिन्न विच्छिन्न भग्न झाली
माणुसकीची जात आता ।
आचार विचार पेटून उठले
धडधड जळते आग आता ।
धर्म संस्कृती जळून गेली
उरली फक्त राख आता ।
माणूस माणूस उरला कुठेहो
रक्तात भिजले हात आता ।
चला निघू या सारेच आपण
गीत अंताचे गात आता ।
Sanjay R.
याद तुम्हारी जब आती
इतना मुझे क्यू सताती ।
दिलमे कैसे लगी है आग
कितनी है भागम भाग ।
निंदभी उड गई कही दूर
मिलने को दिल है आतुर ।
पल भर जब, मिटती पलंके
ख्वाबमे भी तस्वीर झलके ।
पास आवो, हो तुम कहां
तुमही तो हो, मेरा जहाँ ।
Sanjay R.
उमलले फुल झाडावर
बघते किलकिले करून डोळे ।
लावले वेड मजला
मन माझे झाले खुळे ।
क्षणिक हसले थोडे रुसले
दरवळला सुगंध दूर ।
भिनला गंध श्वासात
मन बेधुंद झाले अधीर ।
रंग फुलाचा गुलाबी
मनमोहक सांगू किती ।
पडलो प्रेमात तयाच्या
वाटे अजूनही ओंजळ रीती ।
पसरले हात दोन्ही
वेचण्या मधूकणं फुलातले ।
भृंगा देऊन कौल गेला
कळले त्यासी अंतरातले ।
Sanjay R.