Monday, September 24, 2018

" दिवस हरवून गेले "

सहजच उलगडता आयुष्याची पाने
आज का कसे आठवण देऊन गेले ।

जन्मापासूनचा तो इतिहास पहा
ते दिवसच कुठे हरवून गेले ।

मातीच्या भिंती त्याला कवलांचे छत
घर म्हणायचो ज्याला ते पडूनच गेले ।

अंगणात असायची बाग आणी बागेत फुलं
परसातली तुळसही सूकूनच गेली ।

गडबड गोंधळ, चाले मुलांचा कल्लोळ
सगळीकडे आता शांत शांत झाले ।

कंचे विटी दांडू धापाधुपी लपाछपी
कसे किती ते खेळ सारे लुप्त झाले ।

आपल्याच धुंदीत डोळे फोडून बघा आता
मोबाईल साऱ्यांच्या हाती आले ।

ऊन थंडी पाऊस वारा नी वेचायच्या गारा
बसल्या जागेवर आता शीण येतो सारा ।

अंतर असो कितीही पायी पायी चालायचे
लपून छापून कधी सायकलवर बसायचे ।

गॅस कुकर पंखा एसी बसायला सोफा
नव्हते यातले काहीच, पाटावरच बसायचे ।

दंगा मस्ती, गप्पा गोष्टी, आनंद सारा
सारेच कसे मोठमोठ्याने हसायचे ।

बालविहार गीतमाला रेडिओ आकाशवाणी
आरामात बसून कान लावून ऐकायचे ।

सारच संपलं आता, गेले जुने दिवस
सांगेल का कोणी काय आता सरस ।
Sanjay R.

Sunday, September 23, 2018

" आसाराम "

राम रहीम आसाराम
इनका है एकही काम ।
जो भी है लुटो सारा
भरो झोली लेकरं दाम ।
Sanjay R.

Friday, September 21, 2018

" सरन "

जगता जगता येते मरन
जमवून ठिवजा लागन सरन ।
यमदूत लय झालेत
सांभायून रायजा बा
नाहीत येऊन कोनिबी धरन ।
Sanjay R.

" दो शब्द "

आज तो कान भी
तरस रहे थे
सुनने को तुम्हारे
दो शब्द ।
बस तस्वीर देखते रहे
और खो गये
तुम्हांरी आखोमे ।
Sanjay R.

" लक्षण नाही बरं "

लक्षण माणसाचं ना नाहीच बरं
क्रोध त्याच्या मनातला
जसा आगीचा धग्धगणारा लोट
स्वार्थ इतका बोकाळला की
दिसतं त्याला फक्त त्याचंच पोट
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

कुणी इथे आहेत खूपच मिजाशी
आणि कुणी एक एक दाण्यासाठी
दिवस काढतात फक्त उपाशी
कुठे अन्नाचा चाले नासोडा
तर कुठे कोरभर भाकरीचा तुटवडा
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

उरलाच कुठे आता माणसात सदाचार
भ्रष्टाचार दुराचार व्यभिचार अनाचार
नाहीत फक्त हे लक्षणं चार
सरलेत सारेच माणसातले
आचार आणि विचार
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

चोरी लबाडीत सगळे ध्यान
बुद्धी शुद्धी केली गहाण
ढोंगी बाबां झालेत महान
लुच्चे पुच्चे लफंगे गीरी
झाली आता आमची शान
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं
Sanjay R.