Sunday, December 22, 2013

" आठवणींचा संदुक "

आठवणींचा संदुक
असाच सांभाळुन ठेवायचा
परत परत थर
धुळीचा पुसुन काढायचा ।
sanjay R.


कला अशीच असते ।
कलाकाराला आनंद देते ।
तर रसीकाला त्रुप्ती ।
जिवनात आमच्या डोकावते ।
मन मंत्रमुग्ध होते ।
हळुच झोके घेते ।
आणी सुर उमटतात ।
ये कहा आ गये हम ।
युही साथ चलते चलते ।
sanjay R.


आली आली दिवाळी
जिवनाचे वर्ष एक
कमी करुन गेली
sanjay R.


जगणे असले
जरी येक आभास ।
प्रत्येक क्षण
जिवनाचा आहे खास ।
पार करायचा आपणा
एक एक फास ।
चला करु या आपण
नवजिवनाचा ध्यास ।
sanjay R.


मला पण आहे
कवितेचा ध्यास ।
मिळे आनंद इतका
जगतो रोज एक
नवीन श्वास ।
sanjay R.


झाली तयारी एकदाची
गडबड घाई दिवाळीची
फुरसत नव्हती क्षणाची
संपवा प्लेट आता फराळाची ।
sanjay R.


आली आली
दिवाळी आली ।
फराळाची
तयारी झाली ।
कपडे फटाक्यात
खिसा खाली ।
साडी साठी नाराज
माझी घरवाली ।
महागाईन सारी
फजीती केली ।
कराव काय
कोण नाही वाली ।
सोडुन चिंता
पेटउ मशाली ।
sanjay R.


बस याद उनकी आइ
और होश गवा बैठे हम ।
रातभर ढुंढते रहे फिर
लौट आये होशमे तो
सुबह हुयी ।
शुभ प्रभात ।।

” चांदीच्या कपात सोनेरी चहा “

चांदीच्या कपात
सोनेरी चहा ।
मोजावे लागतील
रुपये दहा ।
जाउन टपरीवर
येकदा पहा ।
न पिताच म्हणाल
वाह वाहा ।
sanjay R.


कधी कधी
दिवस असाही येतो ।
दुर कुठतरी
कंटाळवाणात नेतो ।
येकाकी मनाला
उदासीनता देतो ।
विचारांचे काहुर
हिराउन घेतो ।
sanjay R.


सुंदर आकाशी
चंद्र पौर्णीमेचा ।
सोबतीला असे
चमचमणाऱया
चांदण्यांची ।
मनी विचारांचे
काहुर माझ्या ।
येकटाच निघालो
आता तयारी आहे
जिवन प्रवासाची ।
खाच खळग्यांचा
खडतर हा मार्ग
हिच असावी
कसोटी जिवनाची ।
sanjay R.

कुठेही जा
फराळाचा आग्रह ।
थकलो बाबा आता
नको तो फराळ ।
दुसरे काही द्या
झाली आहे सकाळ ।
sanjay R.

” आले भरुन डोळे “

भरुन आले डोळे
आसव नेत्री मावेना ।
गळी आला हुंदका
रड आता थांबेना ।
आठवणीना पुर आला
दुखः मनाचे कळेना ।
sanjay R.


आषाढ कार्तिकी
जनसागर लोटला ।
पंढरपुरात जन
भक्तीसागरात डुबला ।
विठ्ठल रखुमाई माझ्या
ह्रुदयात वसला ।
गजर नामाचा करु
जय जय हरी विठ्ठला ।
sanjay R.


आठवत मज ते लहानपण
आणी लहानपणातले खेळ ।
कधी धाबाधुबी लपाछपी
तर कधी लगोऱयांचा मेळ ।
कधी उनाडक्या करत फिरायच ।
तर कधी शाळेला बुट्टी मारुन
नाल्यावर मासोळ्यांना धरायच ।
पाठीत आईचा दणका बसता
दुर कुठतरी लपुन बसायच ।
लपुनच आईला शोधतांना
बघायच ।
आणी मनातल्या मनात
खुप हसायच ।
मित्र मैत्रीणींशी खुप भांडायच।
परत हसत हसत मिळायच ।
मोठ्ठे झालो आता म्हणुन
टेंशन मधेच जगायच ।
sanjay R.

” जपायचे बेधुंद मनाला “

गोड मधुर हलकी थंडी
उब हवी आता तनाला ।
हळुच पांघरुणात शिरायचे
जपायचे बेधुंद मनाला ।
sanjay R.

येता झुळ झुळ वारा
डोलतो निसर्ग सारा
मनही लागे डोलाया
शोधीतो एक किनारा
sanjay R.

” अधीर कान झाले ऐकाया काव काव ”

कावळोबा करता
तुम्ही काव काव ।
दिसत नाहीत इतक्यात
सोडला का गाव ।
लहानपणा पासुन
ऐकतोय तुमचे नाव ।
काडीच्या घराची
आहे तुम्हास हाव ।
वाहुन गेले तरी
परत मांडता डाव ।
या परत येकदा
छान आमचा गाव ।
अधीर कान झाले
ऐकाया तुमची काव काव ।
sanjay R.


उघडता बंध
येक मनात ।
दरवळतो गंध
प्रेमाचा क्षणात ।।
अवतरते गोड
छवी एक नजरेत ।
धुंद होतो मी
तुझ्या कल्पनेत ।।
घेउनी तुझाच
हातात हात ।
दुखः सारी
विसरतो क्षणात ।।
झेपावतो आकाशी
असते तुझीच साथ ।
नाही मग उमजत
सरते कशी ती रात ।।
sanjay R.