जीवनाची तूच साथी दार
वाटतो किती आधार ।
जातो विसरून तुझ्यासवे
नसतो कशाचाच भार ।
कधी मनात उठते वादळ
सारखे डोकावतात विचार ।
होते नजरही शून्य
लागते डोळ्यांनाही धार ।
सुन्न पडते डोके आणि
अंतरात होतात प्रहार ।
होताच आठवण मग तुझी
मनात फुलते बहार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment