Wednesday, February 1, 2017

" बळीराजाची व्यथा "

बळिराजा तु नाही तुज
उन्हा तान्हाची फिकीर ।
पान्या पावसाशी तुझी
किती जुळली लकीर ।
उपसतो कष्ट किती
होतोस तु अधीर ।
पावसाच्या वाटेवर
नजर लागे भीर भीर ।
वेडावती ढग तुला
कधी होतो मग उशीर ।
कधी होतो पुर पाणी
तुटतो जिवाचा धीर ।
निसर्गाच्या हाती सारे
सोसतो सारे तीर ।
चंदना वाणी झिजतो
गड्या तुच शुर वीर ।
चिंता वाहतो दुनीयेची
अर्धपोटी तुझा संसार ।
लेतो शिउन फाटके
परी दिव्याखाली अंधार ।
Sanjay R.

No comments: