मन आभाळ आभाळ
ढगांचा हा खेळ।
कोणी आहे मवाळ
कुणी आगीचा जंजाळ ।
मन जिंकायचे इथे
मिळे प्रेमाचे आयाळ ।
नका करु कुणा
शब्दांनी घायाळ ।
आपले होती सारे
वाणी असता मधाळ ।
नाही कुणाच्या हती
अंताचा तो काळ ।
Sanjay R.
प्रवासाला अंत
हा असतोच ।
मार्ग कितीही
आढ्या वेढ्याचा असो
कुठे तरी
तो संपतोच ।
अनुभव मात्र
प्रवासातले
असतिल जरी
सुखद वा कटु
कोपर्यात मनाच्या
मी जपतोच ।
Sanjay R.
शब्दांनीच शब्दांचा
काय अनर्थ केला ।
ह्रुदयी काय कुणाच्या
आडवा स्वार्थ आला ।
रचना रुपांकित होता
स्वरुपे परमार्थ जळाला ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment