मनात किती विचार
कुणास ते सांगायचे ।
त्यातच जीव गुरफटतो
सांगा असेच का जगायचे ।
सुखाचे क्षण येतातच
गालात खूपच हासायचे ।
दुःखाचे क्षण येतिजाती
त्यानाही पार करायचे ।
Sanjay R.
येता आभाळ आकाशात
भाव बदलले चेहऱ्यावरचे ।
तळतळ करणारे उष्ण वारे
शीतल स्वरूप झाले त्यांचे ।
सर सर आल्या सरी धावून
मग वाहू लागले पाट पाण्याचे ।
निसर्गानेही मग रूप बदलले
अंथरले कुणी हे हिरवे गालिचे ।
दूर बसून मी कौतुक बघतो
दिवस सुंदर किती पावसाचे ।
Sanjay R.