मन अधीर झाले
कशा कशात गेले ।
आकाश इतके विचार
फिरून नभात आले ।
गती किती या विचारांची
नाही विसावा मनाला ।
वाटे कधी मनात
आता सांगू मी कुणाला ।
भिरभिर पाहे डोळे
कान वेध तो घेती ।
मन भरले जरी तुडुंब
जागा अंतरात रीती ।
Sanjay R.
बाबू घे ना हातात ईळा
पर लटकवू नको गळा ।
टाक ना कापून तन
पिकन जास्त मन दोन मन ।
येईन पैसा हातात त
लागण तुह्याचं कामात ।
पैशानच होते बापा सारं
दुःख गरीबच नाही बरं ।
लेकरायले नाही शाळा
चालते निस्ता खेळा ।
पडलं कोणी बिमार पोट्ट
औषध कुठी न डॉक्टर कुठी ।
मेहनतीवर तुयाच बापू
वाजते राजकारणात भोपु ।
नशीबच तुह गा फुटक
आयुष्यही झालं तुटक ।
कधी निसर्गाचा घात
धुते व्यापारी बी हात ।
पर हारू नको असा
दिवस तुह्या बी येईन तसा ।
सोडू नको गा मेहनत
नशीब फिराले येळ नाही लागत ।
Sanjay R.
तू कोर चंद्राची
राणी आहेस अंधाराची ।
टीम टीमती तारे
सभा आकाशाची ।
धराही फुलली
चमचम काजव्याची ।
ताल सूर जमला
मैफिल रातकिड्यांची ।
मधेच डोकावून जाती
आरास तिथे ढगांची ।
उठून सारे जाती
लागता चाहूल सूर्याची ।
Sanjay R.