Thursday, January 17, 2019

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ 2019

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे कवी कट्टा मंचावर कविता सादर करताना मी...





" ओलावते कडा माझ्या डोळ्यांची "

लेक तू ग माझी लाडाची
आहेस सावली झाडाची ।

तीळ तीळ झाली मोठी
जशी तुळस अंगणाची ।

फुलविले छान घर तुने
झालीस फुल तू वेलाची ।

होतीस तू लहान जेव्हा
दुडू दुडू कशी ग चालायची ।

क्षण आनंदाचे होते सारे
खुदु खुदु किती ग हसायची ।

वाटतं अजूनही आहेस तू छोटी
छकुली माझ्या तू स्वप्नांची ।

येईल तो दिवस जाशील दूर
ओलावते कडा माझ्या डोळ्यांची ।
Sanjay R.

Wednesday, January 9, 2019

" कसा रे बापू "

आस तुला रे कशाची बापू
राम कसा तू विसरला बापू
तू कलंकित केला बापू
विश्वसच उडाला बापू
नावात तुझ्या रे राम बापू
तुजविण रावण बरा बापू
Sanjay R.

Tuesday, January 8, 2019

" भारत माझा बदलला का "

वाटते भीती, तथ्य किती
कुणी कुणाला सांगेल का ?

एकोपा तर दिसतो अजूनही
अंतरातच तो हरला का ?

मीच म्हणतो, सारेच जाणतो
विश्वास खरंच सरला का ?

माणसा माणसात भेद कशाचा
विचारात तो फिरला का ?

शेजार्याला बघतो मी
त्रयस्थाला तो कळला का ?

सांगा मला जरा कुणी
भारत माझा बदलला का ?

नको नको ते विचार येतात
माझा मीच बदलला का ?
Sanjay R.


Sunday, January 6, 2019

" किती ही थंडी "

किती ही थंडी
होते उलार बंडी ।
थरथरते अंग
गुल होते दांडी ।
वाटे प्यावा गरम चहा
पडतात रुपये दहा ।
लाकडं किती जाळायची
झाडं होताहेत स्वाहा ।
कडाका थंडीचा कसा
वाटे अति भारी ।
मी मी म्हणणारी बघा
कापताहेत सारी ।
नकोच वाटते थंडी
होते उलार बंडी ।
होत नाही सहन
दाखवा लाल झंडी ।
Sanjay R.