कावळ्याच्या शापान
कठे कोण मारत ।
मन मात्र मनातच
खुप खुप झुरत ।
काळजी आणि भीती
त्यातच सार हरत ।
कळत नाही मग
आयुष्य ही सरत ।
Sanjay R.
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
विचारांचे वादळ
डोक्याला किती भार
घोंगवणारे वारे
होती बुध्दी वर स्वार ।
सारेच होते मग
अगदी तार तार ।
शोधतो कुणाचा मग
मिळतो का तो आधार ।
निघतोच कुठे त्यातून
दूर किती असतो पार ।
बोथट झालेली असते
मनातली संशयी धार ।
मीही स्वीकार करतो
स्वतःची स्वतःचीच हार ।
Sanjay R.
अंधार बघतो वाट
होईल कधी पहाट ।
चिव चिव चिमण्यांची
काय पहाटेचा थाट ।
रात्रीचा सरेल काळोख
घडेल सूर्याशी गाठ ।
येईल बहरून मोगरा
भरेल सुगंध काठो काठ ।
निपचित होती पडून
जाईल भरून ही वाट ।
दुर मंदिरातला नाद
नी वारा मोकळा सैराट ।
Sanjay R.